Sunday 26 January 2020

Princess Sheikha Mahra with mother


शिवरायांचे गुरु

शिवाजी महाराजांच्या आदरनिय व्यक्तिमत्वांपैंकी हेही असू शकतात.शिवाजी महाराजांचे आजोबा सुफी संताला फार मानायचे.त्यांच्या आशिर्वादानेच त्यांना शहाजी आणि शरिफजी या दोन मुलांचा जन्म झाला
अशी श्रद्धा आहे.


Great Antiquity of “Hamdan” and “Zanjan” province of the Iran

In ancient times Hamdan city was known as “Ecbatana” or
Hangmetane means the place of gathering. City was found by Havkshtra the great king of Median dynasty.
Madan,Hebrews,Arab and Aram tribes were relatives of each other were living together in Syrian desert. Only Aram tribe had their own script but this script didn't get royal touch or kingship yet. Median king “Havakshtra” the great had made this script as royal script of his empire.
Out of those tribes Madan tribe was closely associated with Arab tribes. Many Arabic people were settled in Hamdan city and learnt alphabets there. Later they developed their own "Arabic" script from Aramaic script.
Ancient name of Zanjan city in Iran was “khamesh”. This city was ruled by “Zanje” tribe which was sub-tribe of Madan tribe. Later in 6th century Iran was conquered by Arab's and they changed name of two cities to Hamdan and Zanjan in memory of their relatives Madan and Zinje tribe. Hamdan is very respectful word for the Arabs. Zanj is also an Arabic word. Zanjan is the most happiest province today & had a rich history.


शिलाहार राजवंश


आज तान्हाजी हा चित्रपट बघितला म्हणून मला शिलाहार राजांची आठवण झाली. उत्तर कोकणातील योद्धे घडविण्यात शिलाहार राजांचे महत्त्वाचे योगदान आहे. मालुसरे हे आडनाव सुद्धा फक्त उत्तर कोकणातच आढळते.या भागातच "मल्लसर" या प्राचीन जमातीचे वास्तव्य होते. आजही हि जमात केरळमध्ये आढळते. या वंशाचा उदय उस्मानाबाद येथील "तेर" या ठिकाणी झाला म्हणून हे राजे "तेर-पुराधीश" हि उपाधी लावायचे.
या वंशाचा संस्थापक हा "कपर्दिन" प्रथम हा होता. कपर्दिन हा शब्द जास्तकरून जैन धर्माशी संबंधित आहे. कपर्दि म्हणजे "जटा" हा शब्द शिवा आणि वृषभदेव यांच्याशी संबंधित आहे.


कूर्ग(कोडवा) लोक

कूर्ग लोक हे कर्नाटकातील मैसूर जवळच्या कोडवा या पर्वतीय क्षेत्रात राहतात. ब्रिटिशांशी यांनी अतिशय निकराचा लढा दिला होता. बरेच ब्रिटिश मारले होते परंतू शेवटी यांची ताकद कमी पडली. ब्रिटिशांनी या भागात कॉफीची लागवड केल्यामुळे यांची आर्थिक भरभराट झाली. तसेच
आधुनिक शिक्षणाचा लाभसुद्धा मिळाला. यांचा राजा राजेंद्र वडियार ने त्याची मुलगी राणी व्हिक्टोरिया ला सेवा करण्यासाठी दान केली आणि ब्रिटिशांनी जप्त केलेली संपत्ती परत मिळविली. नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारून ले. कर्नल जॉन कॅम्पबेल शी विवाह केला.
अगोदर हिचा विवाह ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या शीख राजा दुलीप सिंह शी करायचा होता परंतू हिचा विवाह ले. कर्नल जॉन कॅम्पबेलशी लावण्यात आला.
हे लोक इतर दक्षिण भारतीयांपेक्षा दिसण्यात आणि वागण्यात फार वेगळे आहेत. यांचा आवाज खडा आणि स्पष्ट असतो. इतर दक्षिण भारतीय काय काय बोलतात हे सुद्धा कळत नाही.


दक्षिण भारतातील नायकांचा इतिहास

मदकरी नायक आणि शिवाप्पा नायक हे कर्नाटकातील नायकांचे प्रमुख राजे होत. हे नायक मूलतः आंध्र-प्रदेश च्या तिरुपती जवळच्या टेकड्यांतील शुष्क आणि दुष्काळी भागात राहत होते. हे लोक मल्लिकार्जुनचे निस्सीम भक्त होते. नंतर यांनी कर्नाटकाच्या पश्चिम घाटात स्थलांतर करून या भागात राज्य केले.
आंध्र-प्रदेशातील सध्याचे भोयार/बेडर हे यांचे पूर्वज.महाराष्ट्रातील रामवंशी(रामोशी) वंशाच्या नायकांचे मूळ सुद्धा यांच्यातच आहे. मदने,भोसले,गायकवाड,खोमणे हि रामवंशी लोकांची प्रमुख आडनावे.यांपैकी मदने सोडून इतर सर्व आडनावे इतर समाजात आढळतात. याचा अर्थ मदने लोक त्यांच्या प्राचीन परंपरेनुसार आंध्र-प्रदेशातील दुष्काळी भागात सुद्धा निवास करत होते. तसेच बरेच मदने लोक महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पश्चिम घाटक्षेत्रात सुद्धा घुसले होते.
मदने हे आडनाव इतर समाजात न आढळण्याचं कारण म्हणजे हजारो वर्षांच्या काळात मुख्य जमातीच्या अनेक पोटजमाती निर्माण झाल्या आहेत.वनात भटकत असताना मदने लोकांचा पश्चिम घाटातील आदिवाशींशी थेट संपर्क आला. नंतर आदिवाशींमध्येही पोटजमाती निर्माण होऊन या पोटजमाती मदने यांच्यापासून दुरावत गेल्या आणि अनेक उप-आडनावं निर्माण झाली.मदनेंच्या बाकी पोट -जमाती एका जागी स्थिर झाल्या होत्या परंतू मदने यांना एका जागी स्थिर होणे मान्य नव्हते. फक्त रामवंशी लोकच मदने यांच्या शेवटपर्यंत सोबत राहिले.अर्थात काही मदने एका ठिकाणी स्थिर होऊन नागरी जीवन सुद्धा उपभोगत होते.
तसेच भारतातील अनेक राजवंशानी काल्पनिक कथा निर्माण करून त्यांचा संबंध काल्पनिक वंशाशी जोडला. पुढे मूळ आडनाव पुसले जाऊन तेच आडनाव कायम राहिले.
रामवंशी लोकांची भोसले,गायकवाड,खोमणे हि आडनावे फार नवीन आहेत. गायकवाड या आडनावाचा संबंध आंध्र-प्रदेशातील काकतीय राजवंशाशी आहे. मदने,भोसले,गायकवाड इत्यादी. आडनावे सिमा भागातील लातूर,बिदर ,गुलबर्गा आणि अगदी हैद्राबाद पर्यंत आढळतात. तसेच मालुसरे हे आडनाव शिवकाळामुळे लोकांच्या समोर आले. हे आडनाव ठराविक भागातच आढळते.नंतरच्या पेशवाई,होळकरशाही,शिंदेशाही आणि पानिपतच्या युद्धात या आडनावाचे संदर्भ मिळत नाहीत.
नायक लोक हे स्वतः दुष्काळी भागात जीवन व्यतित करून सुपीक भागातील लोकांचे रक्षण करत असत.


उज्जैन आणि धारचे प्राचीन वंश



काळे(कार्दमक वंश) ---सुमारे ३५० वर्षे उज्जैन वरती शासन करणारा वंश. फार प्राचीन वंश आहे हा. फार प्राचीन काळापासून हे लोक कालीचे पुजारी आहेत. परंतू संस्कृती करणामुळे आता तेथील पुजाऱ्यांची आणि तेथील लोकांची आडनावे बदलली आहेत. माझा एक काळे आडनावाचा मित्र आहे तो सांगतो कि १५ व्या शतकात हे लोक उज्जैन मधून आले आणि त्यांना नगर जिल्ह्यात वतने मिळाली होती. गुप्त राजांनी त्यांचा पराभव केल्यावरती बरेच काळे हे पाचव्या शतकातच दक्षिणेकडे आले होते. काळे हे कालीला मानणारे तर गुत शासक हे वैष्णव होते. माझ्या आजोळचे आडनाव काळे आहे.
पवार -----परमार वंश
परमार हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे सामंत होते. इतिहासकारांच्या मते हा मूलतः दक्षिण भारतीय वंश आहे परंतू नंतर या वंशाचे संस्कृतीकरण झाल्यामुळे याचा सबंध अग्निवंशाशी जोडला गेला आहे.अग्निवंशाच्या मिथकाची कथा परमारांच्या काळात प्रचिलित नव्हती.कोणत्याही परमार शासकाने अग्निवंशाच्या मिथकाबद्द्ल एक अक्षर हि लिहिले नानव्हते परंतू परमारांच्या सुमारे ४०० वर्षानंतर म्हणजे १५ व्या शतकात हि कथा निर्माण केली गेली आहे. पवार/पोवार हे आडनाव महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र-प्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सापडते. या भागातील पवार आडनावाच्या लोकांत अंबाजी,लिंबाजी, निंबाजी इत्यादी.आडनावे मोठ्या प्रमाणात सापडतात. अंबा आणि काली या लोकांच्या मुख्य देवता आहेत. दक्षिण भारतातील मुदिराज समाजाच्या सुद्धा याच देवता आहेत.
धारच्या परमार वंशाच्या सुरुवातीच्या शासकांची नावे अवैदिक होती हे सिद्ध करतात कि परमार हे मूलतः दक्षिण भारतीय वंशाचे होते.
सुरुवातीचे परमार शासक
१. सियाका
२. वाक्पती उर्फ वप्पीराजा उर्फ बप्पीराजा
३. मुंजा


कुर्द आणि आजचे तुर्क हे एकच आहेत काय?

कुर्द आणि तुर्क हे एकच परंतू त्या भागात तुर्कांनी राज्य केल्यामुळे त्यांचे शेजारील भाऊबंध स्वत:ला तुर्क म्हणू लागले.खर म्हणजे तुर्क हे पुर्वेकडून पश्चिमेकडे गेलेले आक्रमणकारी मंगोलांचे भाऊबंध तर कुर्द आणि तुर्क हे उंच,देखणे काकशेश वंशी अाहेत.हुक्का ओढण्याची प्रथा कुर्दांनीच सुरु केलेली आहे.
आक्रमणकारी मंगोल किंवा मोगल हे सोबत जास्त महिलांना घेऊन जात नसत.जिकडे जाईल त्या महिलांशी लग्न करत.काकशेस वंशी तुर्कांनी सुद्धा भारतावर आक्रमण केले होते.ते येताना सोबत फार कमी महिला घेऊन आले होते.त्यांनी मोगलांच्या अगोदर भारतात दिल्ली वरती राज्य केले होते.नंतर हे सुलतान दक्षिणेकडे येऊ लागले.
कुर्द आणि त्यांचे बांधव तुर्क यांचा प्राचीन धर्म हा भारतीयांप्रमाणेच सनातनी धर्म होता परंतू अरब आक्रमणामुळे नाईलाजाने त्यांना ईस्लाम स्विकारावा लागला. कुर्द हे स्वत:ला प्राचीन मिदी लोकांचे वंशज समजतात.मिदी आणि अरब यांचे संबंध चांगले असल्यामुळे सुरुवातीला अरबांनी त्यांना धार्मिक स्वातंत्र दिले होते परंतू नंतरचे काही अरब राजे क्रूर निघाले.कुर्द लोक हे त्यांची वेगळी संस्कृति आजही टिकवून आहेत.याच कारणामुळे सद्दाम हुसेन याने बरेच कुर्द मारले होते.
भारतातावर राज्य करणारे कुर्दांचे भाऊबंध तुर्कांना पण ईस्लाम स्विकारवा लागल्याची खदगद आणि सनातन धर्माबद्दल आदर वाटत नसेल हे आपण नाकारु शकत नाही.

निसर्गाचा नियम


काही हजार वर्षे अगोदर ताटातूट झालेली माणसे नंतर आपल्या लोकांना भेटतात आणि आपल्याच लोकांच भल करतात हा निसर्गाचा नियम आहे.म्हणजे नदी कधीतरी सागराला मिळतेच.सुलतानी आक्रमणामुळे पुर्ण समाज हा विखुरला होता. बरेच लोक माळरानावरती मेंढपाळ करत होते.अशातच आमचे पुर्वज हिराजी-नाईक(मदने) हे सरदार बिजापूर भागातून गावात आले होते.त्यांना सधन गावची जहागीर मिलाळी होती.नाईक असुनसुद्धा त्यांनी त्यांची मुलगी एका मेंढपाळ घरात दिली होती.
त्यांनी गावात महालक्ष्मी देविचे मंदिर बनविले.मुलीकडची परिस्थिती नाजूक म्हणून मुलीकडच्या लोकांना मंदिराच्या पुजेचा मान दिला.आजपण मंदिराचे पुजारी हे शेंडगे आडनावाचे लोक आहेत.
या एका पुर्वजाची आज ५०० कुटुंबे झाली आहेत.गावातील ७०% जमिन मदने यांच्या ताब्यात आहे.गावात पाटलांचा वाडा आजही आहे.
नंतर मदने लोक शेती करु लागले.पुढे भोसले घराण्याच्या उदयानंतर गावची जहागिर अक्लकोटच्या भोसले घराण्याला मिळाली.गावात भोसले यांची तीनच कुटुंबे आहेत.

आमच्या गावातील किल्ला

गावात एक किल्ला आहे.किल्याचा एकंदर आकार पाहता ही गढी असावी.ही गढी कधी बांधली याचा काही लिखित पुरावा नाही आहे परंतू या ठिकाणी लढाईच्या खुणा आहेत.कदाचित सुल्तानी आक्रमणामुळे येथील लोक विखुरले असावेत.आम्ही ही गढी असलेल्या सुपिक गावात राहतो परंतू आमचे सर्व नातेवाईक हे आजूबाजूच्या दुष्काळी गावांत पसरले आहेत. गांव फलटण पासून ८० किमी अंतरावर आहे.फलटण लाही अशीच गढी आहे आणि फलटणच्या या गढीत सुद्धा आक्रमण झाले होते आणि या गढीत राहणारे लोक आजूबाजूच्या दुष्काळी भागात पसरले होते असे लोक अजूनही बोलतात परंतू याचा काही लिखित पुरावा नाही आहे कारण इतिहास हा जेत्यांनी लिहलेला असतो आणि तत्कालीन छोट्या गावांतील इतिहास हा लिखित राहत नसतो किंवा तो नष्ट केला जातो. 



इतिहास बदलविणाऱ्या परंतू दुर्लक्षित जमाति,वंश आणि त्यांची त्यांची मुळ कार्यक्षेत्रे

या जमाती दुर्लक्षित राहिल्या कारण दुर्गम भागात राहून या लोकांनी योद्धे घडविले. यांतील धारचे पवार आणि उज्जैन चे कार्दमकच फक्त प्रास्थापित घराणी होती परंतू नंतर त्यांचीही सत्ता गेली. नंतर हे दिल्ली सुलतानांचे सरदार बनले परंतू स्वराज्य स्थापनेचा कट यांच्या डोक्यात शिजत होता. त्यानुसार यांनी योजना आखल्या. बरेच दर्जेदार सरदार घडविले. भोसले वंशाला उचित ठिकाणी नेऊन पोहचविले. नंतर शिवछत्रपतींचे मुख्य शिलेदार हेच लोक होते. यांच्याशिवाय स्वराज्य स्थापनेची आपण कल्पनाच करू शकत नाही.छत्रपती शाहूंनी तर या लोकांना अमाप जहागिऱ्या लाटल्या होत्या.
मेंढपाळ,शेती,शिकार आणि किनारी भागात मासेमारी आणि मिठागरे चालवून हे लोक त्यांची उपजीविका करत. हे लोक दुष्काळी आणि डोंगराळ भागात शेती करत परंतू सुपीक भागात शेती करणारे कुणबी आणि यांच्यात दूर दूरचा फरक होता.
या भागातील राष्ट्रकूट,चालुक्य,यादव इत्यादी. मोठ्या साम्राज्यांत हाटकरांचा मोठा भरणा असे. बरेच हाटकर जहागिऱ्या मिळवून प्रस्थापित घराणी झाली होती.मात्र मुस्लिम आणि ब्रिटिश आक्रमणामुळे हाटकर पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे इथे उल्लेख केलेली बाकीची घराणी जहागीरदार म्हणून अगदी नव्यानेच उदयाला आलेली आहेत.



असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास)



असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास)
महाराष्ट्र हे देशातील अतिशय महत्वाचे राज्य. जेव्हा देशावरती आणि संस्कृतीवरती संकट आले त्यावेळेस महाराष्ट्रच पुढे आला होता.महाराष्ट्र आणि प्राचीन तुर्कीची "हट्टी" भूमी यात बरेच साम्य आहे. हट्टी भूमी हि सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे डोंगराळ आणि झाडाझुडपांनी व्याप्त होती. याठिकाणी अनेक गढ किल्ले होते. विंध्याच्या दक्षिणेकडील धार,मराठवाडा ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश चा सीमावर्ती भाग हा दंडकारण्याने व्याप्त होता. या भागाचे प्राचीन नाव "मर-हट्टी" भूमी हे होते. "मर-हट्टी" हा कानडी शब्द आहे. मर म्हणजे झाडेझुडपे आणि "हट्टी" म्हणजे वसाहत. "मर-हट्टी" म्हणजे झाडाझुडपांनी व्याप्त वसाहत. मूळ मराठा योद्धे याच भागात उदयाला आले. या भागाच्या पश्चिमेककडील भाग हा सुपीक प्रदेश होता. या भागात धनगर आणि कुणबी/माळी लोकांची वसाहत होती.
ईसवी.सन. पुर्व ५०० सालांपासून ते इसवी पाचव्या शतकापर्यंत शक आणि हुण लोक भारतात येऊ लागले. शक लोक नंतर दक्षिणेकडे आले. त्यांनी इथल्या सातवाहन साम्राज्य आणि मल्ल जमातीचा पराभव केला. सातवाहन हे औंड्र(वडार) वंशी होते.शक लोक हे मूळचे सिरियातील. पुढे असुर(असेरियन) लोकांनी त्यांना हाकलून लावल्यावरती हे मध्य-आशियात आले. शक हे मुळात काळेसावळे होते. त्यामुळे त्यांच्यात "काळे" हे प्रमुख आडनाव सापडते. मध्य-आशियात त्यांनी इथल्या गोऱ्या आणि उंच महिलांशी विवाह करून गोरी आणि धिप्पाड मुले निर्माण केली. भारतात येताना प्रमुख वर्ग वगळता हे लोक अविवाहित मुलांना घेऊन आले कारण अविवाहत मुलांना आणले तर सोबत महिला नसल्यामुळे गति अधिक प्राप्त होते. बाकीची मुले मध्य-आशियातच ठेवली. पुढे याच मुलांनी भारतावरती आक्रमण केले. हि मुले म्हणजेच गोरे,उंच आणि धिप्पाड तुर्क आणि मोगल लोक.निसर्गाच्या नियमाप्रमाणे नदी शेवटी समुद्राला मिळतेच.
इतिहासात या घटनेशी साम्य असणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. पारसी पुराणांत रुस्तुम ने एका वनातील महिलेशी लग्न करून तिला गरोदर अवस्थेत सोडून दिले. पुढे मुलगा सोहराब ने आपल्या वडिलांशीच युद्ध करून त्यांना हरविले हि कथा आहे. आपल्याकडे लव आणि कुशची कथा प्रसिद्ध आहे. शेवटी नदीचे पाणी समुद्राला मिळतेच हा निसर्गाचा नियम आहे.
शक लोक काळेसावळे असल्यामुळे आपले राम,कृष्ण आणि विठ्ठल हे देव काळे-सावळेच होते. गोऱ्या अविवाहित मुलांनी भारतातील मल्ल या जमातीच्या महिलांशी विवाह करायला सुरुवात केली (याला अनुवांशिक आधार आहे) परंतू विवाहाचे प्रमाण फार कमी होते कारण वंश चालवायला एका पुरुषाच्यासाठी एक महिलासुद्धा पुरेसी असते. पुढे काळेसावळे लोक सुपीक भागात राज्य करू लागले आणि गोऱ्या लोकांना सीमावर्ती भागात रक्षणासाठी ठेवण्यात आले. सुपीक भागातील राज्य करणाऱ्या धनगर आणि माळी/कुणबी या प्रमुख जमाती होत्या. धनगर लोक जहागीरदार तर माळी/कुणबी हे पाटील असायचे. धनगर हे प्रशासन चालवायचे तर माळी/कुणबी हे शेतीची कामे आणि बलुतेदारांचे नेतृत्त्व करायचे.ते लोकांचे प्रश्न धनगरांपुढे मांडायचे. धनगर म्हणजे धनाचे-आगार. माळी हा शब्द "मल्ल" या जातीवरून आला असावा. मल्ल-मळा-माळी असा विकास होता गेला असावा. धनगर,माळी आणि कुणबी हे शब्द पेशवाईच्या अगोदर इतिहासात लिखित स्वरूपात कुठेच सापडत नाहीत कारण हे शब्द स्थानिक पातळीवरती एखाद्या कुटुंबासाठी वापरले जायचे कोणत्याही एका विशिष्ट जमातीसाठी नव्हे. शासक लोकांनी जास्त महिला आणल्या नसल्यामुळे त्यांनी काही प्रमाणात मल्ल जमातीतील महिलांशी विवाह केले होते. त्याकाळात थोड्या प्रमाणात धनगर आणि माळी/कुणबी या लोकांत विवाह होत असत कारण अगोदर पूर्णतः पशुपालन करणाऱ्या धनगरांचा आणि नंतर जहागिऱ्या संभाळणाऱ्यांचा वंश २०० वर्षानंतर पूर्णपणे शेतकरी बनून कुणबी किंवा माळी बनण्याची प्रक्रिया सुरु होत असे.
धनगर लोकांच्या गढ्या आजही मराठवाड्यात प्रसिद्ध आहेत. माझ्या गावात पांढरे हे आडनाव माळी समाजात आढळते. हे पांढरे म्हणजे मूळ "पुंड्र" वंश ज्यांनी पंढरपूरची स्थापना केली होती.माझे गाव पंढरपूर पासून फार जवळ आहे. पंढरपूर हे आपल्यासाठी मक्केप्रमाणेच आहे. राजे-पांढरे हे आडनाव शिखर-शिंगणापूर जवळच्या धनगर समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. पहिल्या शाहूंच्या काळात राजे -पांढरे हे पराक्रमी धनगर सरदार घराणे होते.
कदम हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आडनाव. कदम हे आडनाव महादेव-कोळी, मराठा-कुणबी आणि दलित समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. महादेव-कोळी हे देवीचे आणि विठ्ठलाचे प्राचीन पुजारी.आजही विठ्ठलाच्या पूजेचा मान महादेव-कोळी समाजाकडे आणि तुळजाभवानीच्या पूजेचा मान भोपे(कदम) पुजाऱ्यांकडे आहे. भोपे(कदम) हे मराठा आहेत. भोप हि राजस्थानात एक जमात पण आहे. मरीआईचे पुजारी आजसुद्धा दलित समाजातील आहेत.
कदंब हे प्राचीन कुळ धनगरांत पण मोठ्या प्रमाणात आढळते.कदम हे आडनाव माळी समाजात मात्र आढळत नाही कारण कदम हे नागरी परिक्षेत्राच्या बाहेर राहत होते.मुस्लिम सुलतान आणि मराठा साम्राज्यात कदम हे जहागिऱ्या मिळवून सुपीक प्रदेशांत घुसू लागले.

मदने हे सुपीक प्रदेश सोडून दक्षिण-पूर्वेला "मर-हट्टी" भूमीत राहायचे. याच भूमीत बरेच राजवंश निर्माण झाले.उत्तरेला धार आणि दक्षिण-पूर्वेला मराठवाडा आणि कर्नाटक-आंध्र चा सीमावर्ती भाग हा मरहट्ट भूमी होती. हे लोक मराठी,कन्नड आणि तेलगू या तिन्हीही भाषा बोलायचे.
हा भाग उंच आणि तगड्या हटकर आणि मराठा योध्यांनी व्यापला होता. हे लोक आपल्या सैनिकांप्रमाणेच सीमावर्ती भागात राहून राज्यांचे रक्षण करायचे ज्याप्रमाणे आपले सैनिक दुर्गम भागात राहून देशाचे रक्षण करायचे.मुळात हे लोक गोरे शक पुरुष आणि द्रविड महिलांच्या विवाहसंबंधातून निर्माण झाले होते आणि नागरी जीवनापासून दूर राहत होते.
नेपाळ आणि उत्तराखंड भागात गोरख्यांचा वर्ग हि याच प्रकारे निर्माण करण्यात आला होता.
मगर हे मुस्लिम सुलतानांनी नेपाळ मधून आणलेले योद्धे. मध्य-प्रदेश आणि महाराष्ट्र हा नेपाळप्रमाणेच डोंगराळ भाग असल्यामुळे मुस्लिम सुलतानांना हा भाग जिंकून घ्यायला मगरांचा फार वापर झाला.मदने हे दक्षिणेकडून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आले होते. नंतर मगर आणि मदने यांनी स्वराज्यासाठी एकत्र लढण्याचे ठरविले. या दोघांचेही स्वराज्याच्या इतिहासात कुठेच नाव नाही कारण या लोकांनी अनेक योद्धे घडविले परंतू जहागिरदाऱ्या घेतल्या नाहीत.यांनी अनेक लोकांना जहागिरीच्या गादीवरती बसविले.स्वराज्याचे मुख्य सूत्रधार हेच लोक होते. या दोन घराण्यांचा वंश एवढा कमी झाला कि यांची आता महाराष्ट्रात फक्त दोनच गावे उरली आहेत आणि तीही अगदी जवळजवळ. मदने हे दक्षिणेला राहतात तर मगर हे उत्तरेला. महाराष्ट्रात जेवढे काही मदने आणि मगर आहेत ते ह्याच दोन गावातून गेलेले आहेत.
स्वराज्याच्या लढ्याचे मुख्य-सूत्रधार मगर आणि मदनेच होते. कदाचित मदने आणि मगर हेच मूळचे मदन-मोहन असावेत आणि संपूर्ण जग जेव्हा बुडायची वेळ येईल तेव्हा हेच दोन वंश परत सभ्यता घडवतील. आता मगर हे मराठा आहेत परंतू काही शेकडो वर्षानंतर हे लोक आपआपसांत लग्न करतील .नंतर मदने आणि मगर यांत मतभेद होऊन युद्धे होतील. परत याच लोकांतून चीन,अरब,युरोप इत्यादी. वेगळे देश निर्माण होतील. कारण ४०० वर्षांपूर्वी सरदार लोक जात/वंश न पाहता आपआपसांत लग्न करायचे.मगर लोकांत मंगोल महिलावंश जास्त आहे तर मदने लोकांत अरब महिलावंश जास्त आहे. त्यामुळे याच लोकांतून परत नंतर वेगळे देश निर्माण होतील. एक दिवस हि दोन्हीही गावे जगाची राजधानी बनतील याची मला खात्री आहे कारण सध्या जागतिक तापमानवाढीमुळे मुंबई सारखी समुद्रकिनारी असणारी मोठी शहरे बुडण्याच्या मार्गावरती आहेत. चीन ला सुद्धा वाढत्या प्रदूषणाचा आणि लोकसंख्येचा धोका आहे. अरबस्तानातील वाढत्या तापमानवाढीमुळे अजून १०० वर्षानंतर लोक तिथे राहू शकणार नाहीत. अन्न आणि पाण्यासाठी भयंकर युद्धे होतील.
उत्तरेला सिंध प्रांतात जी सध्या मोहना जमात राहत आहे ती परत इतिहास घडवू शकते. कारण हे जग गोल आहे आणि वारंवार इतिहासाची पुनरावृत्ती होते.
दक्षिण पूर्वेकडील "मर-हट्टी" देशातील मराठा योद्धे मुस्लिम सुलतानांचे सरदार बनले आणि पश्चिमेकडे घुसले.पश्चिम भागातील प्रदेशांची प्राचीन नावे हि करहाटक,कुंतलदेश ,कोंकण अशी होते. महाराष्ट्र अलीकडे निर्माण झालेले मर-हट्टीचे संस्कृत रूप होय.
याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे दोन प्रमुख समाज म्हणजे येथील आद्य-वसाहतकार आहेत. या लोकांच्या पूर्वजांनी येथील वनांत आणि डोंगरदऱ्यांत वसाहती घडविताना फार मेहनत घेतलेली आहे. आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय?
मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...
आता तरी जागे व्हाल?