Sunday 8 March 2015

शिवजयंति तारखेने की तिथीने ?

माझे मत " तिथीने " साजरी केली पाहिजे असे आहे. तर्कशुद्ध आणि तटस्थपणे विचार करता " तिथीने" हे उत्तर मिळते .
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथी नुसार व्यवहार होत असत . इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन केलेंडर्प्रमाणे व्यवहार होत.
ग्रेगेरिअन केलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने केली पाहिजे. महात्मा फुले, गांधीजी , डॉ. आंबेडकर , टिळक या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू झाल्यावर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते . गांधिजिंच्या , टिळकांच्या किंवा अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करणे योग्यच आहे.
तुकाराम , बसवेश्वर , शिवराय , बुद्ध या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे .. त्यांच्या काळात तिथीने सारे व्यवहार करत असत. त्यांचे जन्मदिवस तीथीनेच साजरे करणे योग्य ठरेल .
तिथी ऐवजी तारखेने जयंती केल्यास फार फार विश्वव्यापक आणि पुरोगामी होते या गार गार भ्रमात कोणि राहू नये .
------------------------------------------------------------------------------------
तुकाराम बीज किंवा बुद्धाची जयंती उद्या कोणि तारखेनुसार साजरी करतो म्हटले तर तो वेडाचार ठरेल . पचांग - मुहूर्त आणि तिथी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत … तिथी हे एक केलेंडर आहे त्याचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही . हेच बर्याच जणाना समजलेले नाही
------------------------------------------------------------------------------------
आज ज्या ग्रेगेरिअन केलेंडर्ने आपण १९ फेब्रुवारी हि तारीख निश्चित करतो ते केलेंडर शिवजन्मा च्या वेळेला युरोपात सुद्धा प्रचलित नव्हते . इंग्रजांनी ग्रेगेरियन क्यालेंडर 1752 साली स्वीकारले . तो पर्यन्त जूलियन क्यालेंडर अधिकृत होते. ज्यूलिअन कालगणना व ग्रेगेरीअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत अधिक १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे अधिक ११ दिवसांचा फरक येतो.त्यामुळे ग्रेगेरियन केलेंडर नुसार निर्धारित १९ फेब्रुवारी तारीख चक्क १० - ११ दिवसांनी चुकते .कोणती कालगणना शिवजन्मा वेळी प्रचलित होती हेच सगळ्यात महत्वाचे आहे .
यावरच्या वाद विवादात दोन्ही बाजू एकमेकाशी बुद्ध, टिळक अशी उदाहरणे देऊन भांडतात. त्याला अर्थ उरत नाही कारण जन्माचा कालानुक्रम कोणीच लक्षात घेत नाही .
हाच कालानुक्रम त्यांच्या विचाराबाबत हि लक्षात ठेवला पाहिजे हे महत्वाचे . काळानुसार समाजाच्या नितीमत्ता धर्म याबद्दलच्या संकल्पना बदलत जातात हे हि लक्षात घेतले पाहिजे. शिवरायांचे आजच्या राजकारणासाठी अपहरण करू नये . ते जसे होते त्याबद्दल सत्यच बोलले पाहिजे . तटस्थ इतिहासकार हा प्रकार आपल्याकडे जवळ जवळ नाहीच . " शिवरायांचे स्वरूप " या विषयावर मी एक वेगळी मांडणी करणार आहे.
सध्या तारखेच्या पक्षात मत नोंदवणे हा पुरोगामी असल्याचा दाखला मानला जातो. प्रत्येक घटना आणि मुद्दा यावर स्वतंत्रपणे विचार - अभ्यास करून मत मांडले पाहिजे . यामुळे कोणता गट दुखावेल का ? असा विचार करण्याला कंपुबाजि म्हणतात अभ्यास नाहि.
उद्या सायंकाळी, ८ मार्च २०१५. सायंकाळी ७ वाजता " शिवरायांचे स्वरूप " या विषयावर बोलणार आहे . पत्ता : हनुमान मंदिरासमोर पौड गाव तालुका मुळशी . पुणे. सर्वांना हार्दिक निमंत्रण

https://www.facebook.com/abhiram.dixit.3/posts/894494597262980

Thursday 5 March 2015

शतपथ ब्राह्मण मेंयाज्ञवल्क्य एक जगह जवाब देते हैं- ‘मगर मैं मांस खा लेता हूं, अगर मुलायम होतो।’

अल बिरूनी ने यह तो साफ कर ही दिया है कि उस काल में पुरोहित वर्ग घोड़ेका मांस खाते थे। संतों में मांसाहार की परंपरा बाद में भी जारी रही है। यहां तककि आधुनिक काल के सर्वाधिक विद्वान व प्रभावशाली हिंदू संन्यासी स्वामीविवेकानंद भी मांस खाते थे। उनकी पोस्टमार्टम रिपोर्ट बताती है कि उनकेअंतिम आहार में मछली भी शामिल थी। महात्मा गांधी ने अपनी आत्मकथा माईएक्सपेरिमेंट्स विद ट्रुथ में एक जगह स्वीकार किया है कि मांस खाना चाहिए।वहां ऐसा प्रतीत होता है कि गांधी अगर अपनी मां से किये गये वादे से बंधे न होतेतो निश्चित ही वे भी मांसाहार करते। गांधी अपने एक मित्र से कहते हैं, ‘मैंस्वीकार करता हूं कि मांस खाना चाहिए, पर मैं अपनी प्रतिज्ञा का बंधन नहीं तोड़सकता।’

शतपथ ब्राह्मण मेंयाज्ञवल्क्य एक जगह जवाब देते हैं- ‘मगर मैं मांस खा लेता हूं, अगर मुलायम होतो।’ आपस्तंब धर्मसूत्र के अनुसार, ‘ गाय और बैल पवित्र हैं, इसलिए खाये जानेचाहिए।’ ऋग्वेद में इंद्र का कथन है, ‘‘ वे मेरे लिए 15 बैल पकाते हैं, जिनका मैंवसा खाता हूं। इस खाने से मेरा पेट भर जाता है।’’ मनु के अनुसार, ‘‘पंचनखियोंमें सेह, साही, शल्लक, गोह, गैंडा, कछुआ, खरहा तथा एक और दांत में पशुओं मेंउूंट को छोड़कर बकरे आदि पशु भक्ष्य हैं।’’ इन कथनों के अलावा और भी ढेरोंश्लोकों का उदाहरण देकर अंबेदकर ने साबित किया है कि हिंदुओं के धर्मग्रंथ भीउनके मांसाहारी होने का समर्थन करते हैं।

Tuesday 3 March 2015

काय खावे - प्यावे यावर निर्बंध लादणारे सरकार कोण ?

काय खावे - प्यावे यावर निर्बंध लादणारे सरकार कोण ? हा मुद्दा खाद्य स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशि निगडित आहे . धार्मिक अधिष्ठानाचे कायदे खपवून घेणार नाही . विरोध गोहत्या बंदीला नसून बुद्धीहत्येला आहे . मी स्वत: आता शाकाहारी झालो आहे . सर्व प्राणि निरागस असतात आणि त्यांना मारू नये असे व्यक्तिगत रित्या मला वाटते . ….कायदा सर्व प्राण्याबाब्त नाही. आणि स्वत:ची धार्मिक मते दुसर्यावर थोपवायला हे काही उझबेकिस्तान नाही . गायीच्या बाबतीतला कायदा धार्मिक मुद्दा समोर ठेवून केलेला आहे .
सौदी अरेबियात काफ़रानाहि सक्तीने रोजा पाळायला लागतो . आपण काही वेगळे आहोत कि नाही ? सरकारने तसाच कायदा आणला आहे . मुस्लिमांचा - ख्रिस्त्यांचा - आणि मुख्यत: पारशांचा खाद्याधीकार काढून घेणे अमानुष आहे. मानवाधिकाराची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचि पायमल्ली आहे. हिंदुच्याहि अनेक जाती गोमांस खातात . इशान्य भारतातले बहुसंख्य हिंदु गोमास खातात . महाराष्ट्रातील गोर गरिबाला त्यांच्या रोजच्या "स्वस्त " प्रोटिन सोर्स ला मुकावे लागेल . खरे पाहता वेदातही गोमेध तुरळक् प्रामाणत आहेत.... .असे काही प्रतिष्ठित अभ्यासक मानतात काही मानत नाही . वेदात काहीही लिहिलेले असो...गाय प्राणि आहे . आईची उपमा चूक … नाहीतर उद्या म्हशीला मावशी आणि बकरीला हिंदूची काकू म्हणाल ! ते काही असो हे चूक आहे….
राश्ट्र्पतिंनि सही केली म्हणजे गोहत्याबंदि कायदा घटनेला अनुसरनुच असणार आहे . पण घटना म्हणजे काही स्मृती - पुराण नाही . .....कुठल्याही ग्रंथात काही गोष्टी काळाप्रमाणे कालबाह्य होत जाणार हे सत्य आहे . मानवता , व्यक्तिस्वातंत्र्य हा घटनेचा मुलभुत उद्देश अधिक मह्त्वाचा आहे . वरवरची कलमे नाही. ....
बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा महत्वाची ... शब्द्प्रामाण्य नाही . ... आणि बुळचट धार्मिक अधिष्ठानावर कायदे बनवणे हि बुद्धीहत्या आहे . विरोध बुद्धीहत्येला आहे.

https://www.facebook.com/abhiram.dixit.3/posts/892188980826875?fref=nf