Sunday 17 November 2019

धार्मिक वर्ग सर्वात जास्त अहंकारी आणि लबाड असतो.


तो एक दिवस म्हणाला जरा बस तुला काही सांगायचे आहे.
इच्छा नसतानाही प्रत्येकदा वाद नको म्हणून बसली.
तुला माहिती आहे का आजकाल सगळा खालचा वर्ग ब्राह्मण मुली पटवून लग्न करतात.
मी : हो म्हणजे प्रेम विवाह करतात चांगलं आहे की
तो : ते बदला घेतात आहे
मी : (ऐकून माथा भडकलेला होता) तुम्हीच ना ते १६ वर्षाच्या धोब्याच्या पोरी बरोबर चाळीसाव्या वर्षी झोपला तिला रखेल ठेवली.
अहो लग्न करतात ते रखेली ठेवत नाही. जानवे घालून अख्खी कृष्णपक्षी शाखा तयार केली हो तुम्ही. केशवपन झालेल्या विधवांची पोट सुद्धा आणली की तुम्ही, संस्कृती शिकवताय आता.
तो: भान आहे का तुला इतक्या मोठ्यांना असे बोलतांना ?
मी : चांगलेच आहे जानवे घातले म्हणजे रखेल पवित्र होते काय? इतकी हिंमत आहे तर लग्न करून मंगळसूत्र टाका की तिच्या गळयात.
तो: तुला वेड लागलं आहे काय? तू कुठे जन्म घेतला आणि काय वागते ,बोलते तुला कळते का? तुझ्या नवऱ्याला हे थेर चालतात का?
मी: हो माणूस म्हणून जगायचे कळले ना . माणूस वर्गात अन वर्णात विभागात नाही. तुमच्या सारख्या थर्ड क्लास माणूस नाही माझा नवरा माझ्या सारखा आहे.
तो : चूक झाली बोललॊ ^



No comments:

Post a Comment